Wednesday, December 4, 2013

असेच कुणीतरी असावे !!


काळोखाच्या गर्द जाळ्यातून
जसे प्रकाशाने यावे
दुर्गम अससेल्या वाटेतूनही
मग सोपे मार्ग दिसावे

अश्रुंच्या त्या धारानीही
तिथेच असे थांबावे
दुखः सर्व विसरून
ओठी हसू उमटावे

भरकटलेल्या त्या मनानेही
स्तब्ध उभे रहावे
आलेल्या त्या वर्षावात
चिंब असे भिजावे

वा-याच्या त्या झुळूकेवर
जसे फुलांनी डोलावे
पैंजणाच्या तिच्या तालावर
स्वर तसे घुमावे

डोळे थोडे तिरपे करून
आपण तिला पाहावे
असे काही क्षण
अनंतकाळ टिकावे

नाजुकश्या तिच्या स्पर्शाने
लाजळूनेही मग लाजावे
हृदयातल्या त्या भावनांनी
हळूच ओठावर यावे

कुठल्याश्या विनोदावर दोघांनी
अगदी मनसोक्त हसावे
हरवून भान सगळे
स्वतःलाच मग विसरावे

अश्या मधुर नात्यात
कधी दुरावे नसावे
आयुष्याच्या ह्या प्रवासात
असेच कुणीतरी असावे !!
------------------------------------------------

श्रीनिवास

No comments:

Post a Comment